Festivals
Festivals
Savai Gandharv
pune international filme festival

  १० व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्‌घाटन समारंभ गुरुवारी पुण्यात मोठ्या थाटात पार पडला. श्रीराम लागू यांच्या हस्ते या फेस्टिवलचे उद्‌घाटन झाले. राणी मुखर्जी आणि आयर्लंडचे भारतातील राजदूत गुडमुंड एरिकसन यांची विशेष उपस्थिती होती. अमिताभ बच्चन आणि आशा भोसले यांना ‘आउटस्टँडिंग काँट्रिब्युशन ऑफ इंडियन सिनेमा’ हा पुरस्कार दिला गेला. इलया राजा यांना "सचिनदेव बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साउंड' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी सांस्कृतिक मंत्री संजय देवताळेही हजर होते. करियरची 50वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सचिन पिळगावकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे, महोत्सवाचे प्रमुख डॉ. जब्बार पटेल, उपाध्यक्ष सबिना संघवी, राज्याचे सांस्कृतिक संचालक आशुतोष घोरपडे, विविध देशांतील चित्रपट कलावंत आदी या वेळी उपस्थित होते.

pune international filme festival

   पुण्याबद्दल असणा-या अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल सांगताना ते म्हणाले की,"चित्रपटसृष्टीत मला नशिबाने आणले आणि प्रेक्षकांनी प्रेमाने स्वीकारले. पुणे कलानगरी म्हणून आवडतेच; पण माझे या शहराशी एक खास नाते आहे. येथेच मी पहिल्यांदा जयाला (बच्चन) भेटलो आणि याच शहरात मी तिच्याशी लग्न करण्याचे ठरवले.''

pune international filme festival

   ‘चांदण्यात फिरताना, माझा धरलास हात...’ हे गाण गाऊन आशा भोसले यांनी पुणेकराना एक वेगळाच अनुभव करुन दिला. आशा भोसले यांनी दिलखुलास संवाद साधत रसिकांना खुश केले. इलया राजा यांचे कौतुक करता करता, त्या म्हणाल्या की सर्वात सुदंर संगीत हे तमिळ मधील आहे. असे म्हणत त्यानीं तमिळमध्ये गाऊन दाखवले. यावेळी इलया राजा म्हणाले,"संगीत हे निसर्गातच आहे. ते कुणी निर्माण करू शकत नाही.''

pune international filme festival

   सध्या मराठी चित्रपटात काम करणारी राणी मुखर्जी मराठमोळी पैठणी, नाकात नथ, हातात हिरव्या बागडया त्यातच मराठीत संवाद साधत आपण पुणेरी असल्याचेही सांगितले. "मी मराठीत बोलले तर चालेल का,' असे विचारत ती म्हणाली, ""मला पुणे खूप आवडते. मी मराठीच आहे, मी मुंबईत जन्मले. त्यामुळे मी मराठी नसले तरी मराठीच आहे. आता मी अय्या ह्या मराठी चित्रपटात काम करुन मी पक्की मराठी झाले आहे.'' आता फक्त तीन शब्द बोलते, असे सांगून राणी लाजत म्हणाली,"अय्या, इश्‍श, अग्गबाई..!''

   सुधीर गाडगीळ व दुरिया शिपचांडलर यांनी सूत्रसंचालन केले व डॉ.जब्बार पटेल यांनी प्रास्ताविक केले. या महोत्सवात 240 सिनेमे 6 वेगवेगळ्या थिएटर्समध्ये 10 स्क्रीन्सवर दाखवले जाणार आहे तसेच हे फेस्टिव्हल 19 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

Other Festivals link


AddThis Social Bookmark Button
 
Untitled Document

  गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपल्याने विविध मंडळे गणेशाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. गणेशोत्सवाची सुरवात झालेल्या पुण्यातही या उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पुण्यातील गणपती उत्सवाची अनेक वैशिष्टये आहेत त्यातीलच एक म्हणजे विविध गणेश मंडळांसमोर वाजवले ढोल ताशांची पथके. पुण्यात अनेक ढोल ताशांची पथके असून त्यांनी डिजेच्या वाढत्या क्रेझमध्येही आपलं वेगळेपण जपलंय हे विशेष. या पथकांना गेल्या कित्येक वर्षांची परंपरा आहे. त्यामुळेच गणेशोत्सव म्हटला की लोकांना पुण्यातील ढोल ताशांचं एक वेगळंच आकर्षण असतं. या पथकांच्या तालमी गणेशोत्सवाच्या एक दिड महिना आधीपासून सुरू झाल्या आहेत.

   पुण्यातील ही ढोल ताशांची पथके अतिशय वेगळी आणि आकर्षक असतात. एका एका पथकात २०० ते ३५० तरुण-तरुणी ढोल वाजवतात. सध्या विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढतोय. त्याचप्रमाणे माणसांचंच काम समजल्या जाणा-या या ढोल ताशांच्या पथकांमध्ये मुलींचाही सहभाग वाढतांना दिसतो आहे. काही पथकांमध्ये तर निव्वळ मुलीच ढोल ताशे वाजवतांना दिसून येतात आणि त्या कुठेही मुलांपेक्षा कमी पडत नाहीत. पुण्यात असणा-या अनेक पथकांपैकी काही प्रमुख पथकांमध्ये नादब्रंह्म, शिवगर्जना, रमणबाग, ज्ञानप्रबोधिनी, विमलाबाई गरवारे ह्या पथकांचा समावेश करता येईल.

   या पथकांपैकी शिवगर्जना हे पथक तर अधिक प्रसिद्ध आहे. त्याचं कारण म्हणजे या पथकात २०० ते ३५० तरुण-तरूणी ढोल ताशे वाजवायला येतात. या पथकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पथकाने प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या ‘उलाढाल’ या चित्रपटातील ‘मोरया मोरया’ या प्रसिद्ध गाण्यासाठी ढोल ताशे वाजवले आहेत. आजही ज्या ज्या ठिकाणी या संगीतकार जोडीचा लाईव्ह शो असतो तिथे हे पथक वाजवायला जातं. त्याचप्रमाणे ज्ञान प्रबोधिनी हे पथकही प्रसिद्ध आहे कारण या पथकात ढोल ताशे वाजवणा-यांमध्ये एकही मुलगा नसून सर्वच मुली आहेत. मुली असूनही त्या मुलांच्या पथकांना तोडीस तोड वाजवतात हे विशेष. हे पथक विसर्जन मिरवणूकीत आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं. हजारोंच्या संख्येने गर्दी केलेले भक्तही त्यांना भरभरून प्रतिसाद देतात. या पथकांना वाजवण्यातून मिळणारा पैसा हा कुणालाही वाटला जात नसून ढोल ताशांच्या दुरूस्तीसाठी, मुलांच्या जेवणासाठी खर्च केला जातो.

   दरवर्षी पुण्यातील मानाच्या गणपतीसमोर ढोल ताशे वाजवणं हे या पथकांसाठी मानाचं मानलं जातं. तसंच या पथकांचं वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सवा व्यतिरीक्त हे कुठल्याही उत्सवाला वाजवत नाहीत. यातील मुलांना कुठलही व्यसन करून वाजवण्यास बंदी आहे. कुणी आढळल्यास त्याला त्याक्षणीच पथकातून काढून टाकल्या जातं. एक कडक शिस्त या सर्वच पथकांमध्ये पाळली जाते. सध्या पथकांच्या तालमींनी चांगलाच जोर धरला असून गल्लो-गल्ली, नदीच्या किनारी, विविध शाळांच्या मैदानावर त्यांच्या तालमी पाहण्यास लोक सध्या गर्दी करत आहेत.


AddThis Social Bookmark Button
 

आज संकष्ट चतुर्थी आहे, तीही अंगारकी. ’संकष्टी’ आणि ’विनायकी’ या गणेशाच्या उपासनेसाठी फार महत्वाच्या तिथी आहेत. विनायकी ही शुक्लपक्षाच्या चतुर्थीला मध्यानी पर्यंत असते. आणि चंद्रोदयाच्यावेळी कृष्णचतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. आजच्या संकष्टीची विशेषत: ही आहे की ती मंगळवारी आहे, म्हणून ती पुण्यप्रद मानली जाते.
या संकष्टीला अंगारकी असे का म्हणतात? हा अंगारक कोण?
अंगारक म्हणजे मंगळ, तो निखा-यासारखा लाल दिसतो. त्याच्या उत्पत्तीविषयीची कथा अशी की, भारद्वाज नावाचे ऋषी अवंती नगरात राहात होते. एकदा ते क्षिप्रा नदीवर स्नानासाठी गेले असता, त्यांना सुंदर अप्सरा जलक्रीडा करीत असतांना दिसल्या. त्यांच्या मनात कामवासना जागृत झाली व त्या कामवासनेचे फलीत म्हणजे अंगारकाचा जन्म.

AddThis Social Bookmark Button
 

होळी एक लोकोत्सव . याला उत्तरेत होरी , महाराष्ट्रात होळी किंवा शिमगा आणि कोकण - गोमंतकात शिग्मा किंवा शिग्मो अशी संन्या आहे. शिमगा किंवा शिग्मा या शब्दाचा उगम सांगताना श्री. रा. चि. ढेरे लिहितात - देशीनाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला ’ सुगिम्ह’ म्हणजे ’सुग्रीष्मक ’ असे नाव दिले आहे. या नावापासूनच कोकण गोमंतकातील मराठीत ’शिग्मा’ हा शब्द सिध्द झाला आहे आणि महाराष्टाच्या अन्य भागात वर्नविपत्ययाने शिमगा असे त्याचे रुप रुढ झाले आहे.

AddThis Social Bookmark Button
 

गुढीपाडवा


चैत्र शु. प्रतिपदेस गुढीपाडवा हे नाव आहे. या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष या दिवसापासून सुरु होते. अखंड भारतात या दिवसाला असाधारण मह्त्व आहे. गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला आहे. या दिवशी काही धार्मिक विधी सांगितले आहेत. त्यात ब्रम्हपूजा हा महत्त्वाचा विधी असतो. तो असा
" चैत्रे मासि जगद ब्रम्हा ससर्ज प्रथमेहनि
शुक्लपक्षे समग्रं तु तदा सु्र्योदये सति
प्रवर्तयांमास तथा कालस्य गणनामपि
तत्र कार्या महाशान्ति:सर्व्कल्मषनाशिनी
सर्वोत्पातप्रशमिनी कलिदु:स्वप्ननाशिनी "
 
AddThis Social Bookmark Button